

Team India
Sakal
IND vs IRE, T20I : भारतीय टी२० संघाला नुकताच मोठा धक्का बसला. रविवारी (२८ जून) आयर्लंडने थरारक दुसऱ्या टी२० सामन्यात भारताला १ धावेने पराभूत केले. त्यामुळे आयर्लंडने बेलफास्टला झालेल्या टी२० मालिकेत २-० अशा फरकाने विजय मिळवला आणि भारताला व्हाईटवॉश दिला. आयर्लंडचा हा भारताविरुद्ध पहिलाच मालिका विजय आहे. यापूर्वी भारतीय संघाविरुद्ध त्यांना कधीही मालिका जिंकता आली नव्हती.
दरम्यान, श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वातील भारतीय टी२० संघाचीही ही पहिलीच मालिका होती. पण त्याच्या कर्णधारपदाला निराशाजनक सुरुवात झाली आहे. तो कर्णधार म्हणून पहिले दोन सामने पराभूत होणारा दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी रिषभ पंतच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिले दोन टी२० सामने पराभूत झाला होता.