Shreyas Iyer
Shreyas IyerSakal

Shreyas Iyer: 'आयपीएल जिंकल्यानंतर जे श्रेय मिळायला हवं होतं, ते मिळालं नाही - श्रेयस अय्यर

Shreyas Iyer on Tough Time: भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकून देण्यात श्रेयस अय्यरचे मोठे योगदान राहिले. पण त्याच्यासाठी गेल्या वर्षभराताचा कालावधी चढ-उतारांचा राहिला. याबाबत त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत जिंकली. भारताच्या या विजयात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने प्रत्येक सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत मोलाचे योगदान दिले.

तो या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला. त्याने २ अर्धशतकांसह २४३ धावा केल्या.

Shreyas Iyer
Champions Trophy विजेत्यांची मुंबईत नसणार विजयी मिरवणूक! रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, गौतम गंभीर आपापल्या शहरात दाखल
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com