
भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून काही दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा केली. तो भारताच्या कसोटी संघाचा कर्णधारही होता. भारतीय संघाला २० जूनपासून सुरू होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जायचे आहे.
या इंग्लंड दौऱ्यापूर्वी रोहितने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता भारताचा कसोटीतील नवा कर्णधार कोण असणार, हे प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून विचारले जात आहेत. यासाठी काही नावंही समोर आली आहेत.