
भारतीय क्रिकेट संघाने ६ जुलैला इंग्लंडला बर्मिंगहॅममधील ऍजबॅस्टन ३३६ धावांनी पराभूत केले. भारताचा हा परदेशातील धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा विजय होताच, याशिवाय ऍजबॅस्टनमधीलही हा भारताचा पहिला विजय होता.
या सामन्यात विजय मिळवून देण्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने मोलाचा वाटा उचलला. त्याला आता त्याचा मोठा फायदा झाला आहे. त्याने केलेल्या कामगिरीमुळे गरुडझेप घेतली आहे. याशिवाय अव्वल क्रमांकावरही नवा खेळाडू विराजमान झाला आहे.