
भारत आणि इंग्लंड संघात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका रंजक वळणावर आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. इंग्लंडने हेडिंग्लेला झालेला पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात पलटवार केला. भारताने ऍजबॅस्टनवर दुसरा सामना जिंकला. त्यामुळे आता तिसरा सामना आघाडी घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे.
भारत आणि इंग्लंड संघातील तिसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमममध्ये १० जुलैपासून खेळवला जाईल. यासाठी दोन्ही संघांची तयारी सुरू झाली आहे.