Sourav Ganguly: 'विराट महान खेळाडू, पण...', गांगुलीचा टी20 वर्ल्ड कपसाठी कोहलीला मोलाचा सल्ला

Virat Kohli: सौरव गांगुलीने टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने विराट कोहली आणि भारतीय संघाबद्दल भाष्य केले आहे.
Virat Kohli | Sourav Ganguly
Virat Kohli | Sourav GangulySakal

Sourav Ganguly - Virat Kohli: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला रविवारपासून (2 जून) सुरुवात होत आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच विराट कोहलीच्या भारतीय संघातील फलंदाजी क्रमकाबाबत चर्चा होत आहेत. यात आता भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने आपले मत मांडले आहे.

गांगुलीच्या मते आयपीएल 2024 मध्ये विराट ज्या स्वातंत्र्याने खेळला, तसेच तो टी20 वर्ल्ड कपमध्येही खेळणे महत्त्वाचे राहणार आहे. तसेच तो म्हणाला, विराटने कर्णधार रोहित शर्मासह सलामीला फलंदाजी करायला हवी.

Virat Kohli | Sourav Ganguly
IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

रेवस्पोर्ट्सशी बोलताना गांगुली म्हणाला, 'विराट आणि रोहितने सलामीला फलंदाजी करावी. माझी इच्छा आहे की विराटने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी जशी फलंदाजी केली तशी त्याने टी20 वर्ल्ड कपमध्येही करावी. त्याने स्वातंत्र्य घेऊन फलंदाजी करावी.'

'विराट महान खेळाडू आहे, हे सांगण्याची गरज नाही, पण त्याने भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी आयपीएलमध्ये केली तशी स्वातंत्र्य घेत फलंदाजी करावी. त्यामुळे सलामीसाठी माझी पसंती विराट आणि रोहित यांनाच असेल.'

विराटने आयपीएल 2024 स्पर्धेत 15 सामन्यांत 61.75 च्या सरासरीने आणि 155 च्या स्ट्राईक रेटने 741 धावा केल्या होत्या. यात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके केली. तो आयपीएल 2024 मधील सर्वाधिक धावा करणाराही क्रिकेटपटू आहे.

Virat Kohli | Sourav Ganguly
Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

गांगुलीकडून भारतीय संघाचे कौतुक

गांगुलीने टी20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघाचेही कौतुक केले, तसेच संघासाठी कोणती गोष्ट फायदेशीर ठरू शकते, हे देखील सांगितले.

तो म्हणाला, 'संघात अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. तसेच आयपीएलच्या माध्यमातून टी२० क्रिकेट खेळून ते स्पर्धेत उतरत आहेत. याचा न्युयॉर्कमध्ये संघाला फायदा होईल. आणखी एका गोष्टीचा त्यांना फायदा होऊ शकतो, ते म्हणजे मोठ्या मैदानाचा. त्यामुळे आपल्या फिरकीपटूंना त्याचा फायदा होईल.'

'वर्ल्ड कपमध्ये भारताला तुम्ही कमी लेखू शकत नाहीत, याचं साधं कारण म्हणजे संघात खूप प्रतिभा असलेले खेळाडू आहेत.'

भारताला टी20 वर्ल्डकपमधील पहिल्या फेरीतील सामने अमेरिकेत खेळायचे आहेत. पहिल्या फेरीसाठी भारताच्या गटात पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड हे संघ आहेत.

भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. त्यानंतर 9 जूनला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. तसेच 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध, तर 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध सामने होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com