
भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. भारताने दुबईला रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात हे विजेतेपद जिंकले आहे. तब्बल १२ वर्षांनी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले.
यापूर्वी भारताने २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होकी. भारताने एकूण तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, तर गेल्या वर्षभरातील हे भारताचे एकूण दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. याआधी जून २०२४ मध्ये भारताने रोहितच्याच नेतृत्वात टी२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.