

Suryakumar Yadav
sakal
कोलंबो : भारत-पाक हा केवळ एक सामना आहे, हे बोलायचे ठीक असते; परंतु हा इतर लढतींपेक्षा वेगळा सामना असतो. त्यांच्याबरोबर सतत खेळत नसल्यामुळे तो वेगळा भासतो. चाहत्यांच्या अपेक्षांचे दडपण असते; पण दडपणाशिवाय आणि अपेक्षांच्या ओझ्याशिवाय खेळायला मजा ती काय? आम्ही दडपणाचा आनंद घेत रविवारी सामना खेळणार आहोत, असे मत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने व्यक्त केले.