Suryakumar Yadav comments on India cricket tactical change
esakal
Suryakumar Yadav comments on India cricket tactical change: राहुल द्रविड व रोहित शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया खेळत असलेला क्रिकेट ब्रँड जुना झाला आहे का? २०२४ मध्ये द्रविड व रोहित यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला, परंतु आता दोन वर्षानंतर तशा शैलीचं क्रिकेट जुनं झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने २०२४ मध्ये टीम इंडिया ज्या शैलीत खेळत होते, ते २०२६ मध्ये कामी येणार नसल्याचे मान्य केले. त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला वैयक्तिक विक्रमापेक्षा खेळाडूंनी मुक्तपणे खेळणे पसंत असल्याचे सांगितले.