Ravichandran Ashwin reaction after India Super 8s defeat
esakal
Two blunders by Team India R Ashwin statement: भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८मधील पहिल्याच सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारताला १११ धावांवर गुंडाळले. या पराभवानंतर टीम इंडियाच्या रणनीतीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यात माजी गोलंदाज आर अश्विनने थेट चुका दाखवून गौतम गंभीर व सूर्यकुमार यादव यांचा समाचार घेतला आहे. भारताने या सामन्यात अक्षर पटेल याला का खेळवले नाही, हा चर्चेचा विषय आहेच.