
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (६ जुलै) इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत इतिहास रचला. भारताने ऍजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात ३३६ धावांनी विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.
या विजयामुळे भारताला मोठा फायदाही झाला आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेचा (WTC 2025-27) भाग आहे. त्यामुळे भारताने या विजयासह गुणांचे खाते उघडले आहे.