

Vaibhav Sooryavanshi
esakal
Vaibhav Sooryavanshi replace Sanju Samson?: या वर्षी भारतीय क्रिकेटमध्ये जर कोणत्या युवा खेळाडूची सर्वाधिक चर्चा झाली असेल, तर तो म्हणजे १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी.(Vaibhav Sooryavanshi)आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आयपीएल २०२६ मध्ये त्याने दमदार कामगिरी करत सर्वाधिक धावा केल्या आणि ऑरेंज कॅप पटकावली.
याशिवाय अनेक वैयक्तिक पुरस्कारही त्याने आपल्या नावावर केले. त्यानंतर श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात त्याने अवघ्या २९ चेंडूत ९४ धावांची तुफानी खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.