

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा उपांत्य सामना मंगळवारी (४ मार्च) दुबईमध्ये सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. याबरोबरच त्याने दोन मोठे विक्रमही केले आहेत.