
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सोमवारी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत १४ वर्षांच्या करियरनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली.