Team India squad T20 WC : सूर्यकुमार, बुमरावर भारताचे भवितव्य! टी-20 वर्ल्ड कपबाबत युवराज सिंगचं मोठं वक्तव्य

T20 World Cup Team India squad : सामना कोणत्याही स्थितीत असताना कलाटणी देण्याची क्षमता असलेले सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमरा यांच्यावर ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे, असे मत माजी सुपरस्टार खेळाडू युवराज सिंग याने व्यक्त केले.
Yuvraj Singh dissects India's options for T20 World Cup squad News Marathi
Yuvraj Singh dissects India's options for T20 World Cup squad News Marathisakal

T20 World Cup Team India squad : सामना कोणत्याही स्थितीत असताना कलाटणी देण्याची क्षमता असलेले सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमरा यांच्यावर ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे, असे मत माजी सुपरस्टार खेळाडू युवराज सिंग याने व्यक्त केले.

२००७ मध्ये पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघाचा सदस्य असलेला युवराज सिंग म्हणतो, जून महिन्यात होत असलेल्या यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत सूर्यकुमारचा फॉर्म भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे, तसेच बुमराकडून सर्वोत्तम गोलंदाजी होणे आवश्यक आहे.

Yuvraj Singh dissects India's options for T20 World Cup squad News Marathi
IPL 2024 LSG vs RR : राजस्थानच्या 'बुलेट ट्रेन'ला लखनौचे 'नवाब' लावणार ब्रेक; काय असेल दोन्ही संघाची प्लेइंग-11?

सूर्यकुमार ज्या पद्धतीने खेळतो ते पाहता तो किमान १५ चेंडूंत सामन्याला निर्णायक कलाटणी देऊ शकतो. त्याचा जास्त वेळ खेळपट्टीवर असणे हे संघाला विजयाजवळ नेणारे ठरू शकते, म्हणूनच सूर्या भारतासाठी मोलाचा खेळाडू असे शकेल, असे युवराजने म्हटले आहे.

जेवढा सूर्यकुमार महत्त्वाचा तेवढाच मौल्यवान बुमराही आहे. त्याचा एखादा स्पेल भारताला विजयी मार्गावर नेणारा ठरू शकेल. असे सांगणारा युवराज युझवेंद्र चहल हा लेगस्पिनर गोलंदाजही संघात असणे गरजेचे असल्याचे म्हणाला.

Yuvraj Singh dissects India's options for T20 World Cup squad News Marathi
DC vs MI : आता ‘प्ले-ऑफ’साठी रस्सीखेच! पंतला पाचव्या विजयाची आस; सहावा पराभव टाळण्यासाठी पांड्याचा काय आहे प्लॅन?

कार्तिकची निवड नको

दिनेश कार्तिक हा आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे; परंतु ३९ वर्षीय खेळाडूला आता संघात निवडणे योग्य नाही. त्यामुळे पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत आणि त्यानंतर संजू सॅमसन यांनाच संधी द्यायला हवी. कार्तिक अंतिम ११ खेळाडूंत असू शकणार नाही. त्यामुळे त्याची निवड करणे योग्य नसल्याचे युवराज म्हणाला.

ही विश्वकरंडक स्पर्धा रोहित आणि विराट कोहलीसाठी अखेरची टी-२० स्पर्धा किंवा मालिका असेल, अशी चर्चा केली जात आहे; परंतु हे दोन्ही फलंदाज महान आहेत. त्यांनी या प्रकारातून कधी निवृत्त व्हावे, यावर युवराजने थेट भाष्य करणे टाळले; परंतु कसोटी आणि एकदिवसीय प्रकारावर अधिक लक्ष देण्यासाठी या दोघांनी टी-२० प्रकार बाजूला ठेवावा, असा सल्ला मात्र दिला. जसे तुमचे वय वाढत जाते तसे लोक तुमच्या वयाबाबत बोलतात; परंतु तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल आणि तुमच्या फॉर्मबाबत बोलत नाहीत, रोहित आणि विराट महान खेळाडू आहेत. कधी निवृत्त व्हावे हे ठरवणे हा त्यांचा अधिकार असल्याचेही युवराज म्हणाला.

शिवम दुबे संघात हवाच

शिवम दुबेला भारतीय संघात खेळताना मला पाहायचे आहे. तो भारतीय संघात आत बाहेर होत राहिला आहे; परंतु या आयपीएलमधून त्याने आपले सातत्य दाखवले आहे. तो ‘गेमचेंजर’ आहे. या आयपीएलमध्ये इतरही काही फलंदाज अशीच तुफानी टोलेबाजी करत आहेत; परंतु दुबे सध्या भलत्याच फॉर्ममध्ये खेळत आहे, असे कौतुक युवराजने केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com