T20 World Cup 2021: सध्या सर्व क्रिकेट फॅन्स IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्याचा आनंद लुटत आहेत. ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच युएई आणि ओमानमध्ये मिळून टी२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. यंदाच्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे सुरूवातीला ही स्पर्धा भारतातच रंगणार होती. पण कोरोनाची भारतातील व्याप्ती पाहता ही स्पर्धा युएई आणि ओमान या देशांमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून IPL स्पर्धेकडे पाहिलं जातंय. याच दरम्यान, ICCने टी२० विश्वचषकाचं थीम साँग लाँच केलं.
टी२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात पात्रता फेरीने सुरूवात होणार आहे. १७ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान ही फेरी रंगणार असून त्यातील सर्वोत्तम ४ संघ 'सुपर १२' साठी पात्र ठरतील. 'सुपर १२' मध्ये सर्व तगडे संघ एकमेकांविरोधात उभे ठाकतील. २२ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ही फेरी पार पडेल. त्यानंतर दोन सेमी फायनल आणि मग अंतिम फेरी अशी स्पर्धा रंगेल.
'सुपर १२'मध्ये असे आहेत दोन गट
अ गट- ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडिज आणि पात्रता फेरीतील दोन संघ
ब गट- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, आफगाणिस्तान आणि पात्रता फेरीतील दोन संघ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.