India vs Australia Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना उद्यापासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषद घेतली.
यादरम्यान ऑस्ट्रेलियन मीडियाने रोहितला खेळपट्टीबद्दल प्रश्न विचारला. रोहित शर्माने त्यांना चोख उत्तर दिले जे आता व्हायरल होत आहे. नागपुरातील खेळपट्टीवरून गोंधळ सुरूच आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत दोघेही आतापर्यंत खेळपट्टीवर विशेष आनंदी दिसले नाहीत. आता खेळपट्टी कोणते रंग दाखवेल हे सामन्यातच कळेल.
ऑस्ट्रेलियन मीडियाने नागपूरच्या खेळपट्टीबाबत प्रश्न केला असता रोहित शर्माने उत्तर दिले की, 'आम्हाला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. उद्या जे 22 खेळाडू खेळतील, ते सर्व दर्जेदार क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना चांगले क्रिकेट खेळावे लागेल.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित हे दोघेही नागपूरच्या खेळपट्टीवर फारसे प्रभावित नसल्याच्या बातम्या आल्या आहेत. दोघांनीही त्यात बदल करण्याची मागणी केली. याशिवाय पत्रकार परिषदेत रोहितने आपल्या चार फिरकी गोलंदाजांचे कौतुक केले.
रोहित पुढे म्हणाला की, आमचे चारही फिरकीपटू दर्जेदार फिरकीपटू आहेत. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी एकत्र भरपूर क्रिकेट खेळले आहे, तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांनीही जेव्हा संधी मिळाली तेव्हा चांगली कामगिरी केली आहे. ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 च्या अंतिम फेरीच्या तिकीटसाठी भारतीय संघ कोणतीही कसर सोडणार नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.