IND vs AUS : बापू मस्त छे! षटकार चौकारचा पाऊस, कांगारूविरुद्ध झळकावले तिसरे अर्धशतक

अक्षर पटेलने चालू मालिकेतील झळकावले तिसरे अर्धशतक
ind vs aus-4th-test-axar patel-third-half-century
ind vs aus-4th-test-axar patel-third-half-century

Ind vs Aus 4th Test Axar Patel : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबाद येथे खेळल्या जात आहे. त्याचवेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 10 गडी गमावून 480 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 571 धावा केल्या आणि 91 धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3/0 आहे. भारताकडे अजूनही 88 धावांची आघाडी आहे. यादरम्यान केएस भरतनंतर अक्षर पटेलच्या फलंदाजीतून सर्वोत्तम कामगिरी दिसून आली आहे.

ind vs aus-4th-test-axar patel-third-half-century
IND vs AUS Day 4 Live: चौथ्या दिवशी विराटची दमदार खेळी! भारताकडे 88 धावांची आघाडी अन्...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शानदार फलंदाजी करताना अक्षर पटेलने अर्धशतक झळकावले. 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षरचे या मालिकेतील हे तिसरे अर्धशतक आहे. त्याने 113 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. अक्षरने नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत 84 तर दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत 74 धावा केल्या.

ind vs aus-4th-test-axar patel-third-half-century
IND vs AUS: मोठा प्लेयर मोठी खेळी! विराट कोहलीचे द्विशतक हुकले मात्र टीम इंडिया ड्रायव्हिंग सीटवर

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी एका मालिकेत सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीत अक्षर सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करत संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी MS धोनीने 2008 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 7 व्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना तीन पन्नास अधिक धावा केल्या होत्या.

ind vs aus-4th-test-axar patel-third-half-century
Virat Kohli: विराटला करौली बाबा पावले; कसोटीत तीन वर्षानंतर विराटनं ठोकलं शतकं

भारताला 393 धावांच्या एकूण धावसंख्येवर श्रीकर भरतच्या रूपाने पाचवा धक्का बसला. यानंतर फलंदाजीला आलेल्या अक्षरने विराट कोहलीसोबत या सामन्यात षटकार चौकारचा पाऊस पाडत भारतासाठी 162 धावांची सर्वात मोठी भागीदारी केली.

भारताच्या कसोटी इतिहासात पहिल्या सहा विकेटसाठी 50 किंवा त्याहून अधिक धावांची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. श्रेयस अय्यर अनफिट असल्यामुळे फलंदाजीसाठी आला नाही, त्यामुळे अक्षर पटेलला सातव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com