Rohit Sharma India vs Bangladesh : बांगलादेश दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाला विजयी सुरुवात करता आली नाही. या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशने त्याचा पराभव केला. 186 धावा करूनही टीम इंडिया मॅच जिंकू पाहत होती पण मेहदी हसन मिराजने शानदार बॅटिंग करत भारताच्या तोंडून विजय हिसकावून घेतला. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघावर संताप व्यक्त केला आहे.
सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'हा खूप जवळचा सामना होता. सामन्यात पुनरागमन करण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न केला. आमची फलंदाजी खराब होती पण गोलंदाजी उत्कृष्ट होती. आम्ही बांगलादेशच्या खेळाडूंवर शेवटपर्यंत दबाव ठेवला. तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की शेवटच्या काही षटकांमध्ये आम्ही विकेट्स घेतल्या आहेत. जास्त धावा करता आल्या नाहीत. आणखी 30-40 धावा झाल्या असत्या तर नक्कीच फरक पडला असता. केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांनीही चमकदार खेळ केला.
'हिट मॅन' पुढे बोलताना म्हणाला की, 'दुर्दैवाने मधल्या षटकांमध्ये आम्ही विकेट गमावल्या, त्यानंतर पुनरागमन करणे कठीण झाले. खेळपट्टीवर फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. फलंदाजी कशी करायची हे समजून घ्यायला हवे. आम्हाला या परिस्थितीत खेळण्याची सवय आहे. अशा परिस्थितीत फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजी कशी करायची ते पाहावे लागेल. संघातील खेळाडूंमध्ये सुधारणा कशी होईल हे मला माहीत नाही, हे सर्व दबाव हाताळण्याबद्दल आहे. दबाव कसे हाताळायचे हे एकदा कळले की ते तुम्हाला आत्मविश्वास देते. अशा परिस्थितीत दबावाचा सामना करणे खूप महत्वाचे आहे. पुढील सामन्यात सुधारणा होईल अशी आशा आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.