Ind vs Eng : अश्विनच्या चुकीचा टीम इंडियाला फटका, बॅटिंग करण्याआधीच इंग्लंडला मिळाल्या 5 धावा; नेमकं काय घडलं?

India handed five-run penalty England to start its innings with 5/0 : अश्विनची एक छोटीशी चूक संपूर्ण संघाला पडली महागात...!
India handed five-run penalty England to start its innings with 5/0 r Ashwin running on pitch cricket news in marathi
India handed five-run penalty England to start its innings with 5/0 r Ashwin running on pitch cricket news in marathi

India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. रवींद्र जडेजा आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी भारतासाठी कर्णधारपदाची खेळी खेळली आहे.

या खेळीदरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने मोठी चूक केली आहे. याचे परिणाम संपूर्ण संघाला भोगावे लागले आहेत. रविचंद्रन अश्विन फलंदाजी करत असताना 102 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अश्विनने ही चूक केली. यासाठी पंचांनी भारतीय संघावर 5 धावांचा दंड ठोठावला आहे.

India handed five-run penalty England to start its innings with 5/0 r Ashwin running on pitch cricket news in marathi
Sarfaraz Khan : 'मी तर घाबरलो होतो...!' धमाकेदार इनिंगनंतर सर्फराजने कोणाला केला व्हिडिओ कॉल?

काय आहे संपूर्ण प्रकरण

इंग्लंडचा गोलंदाज रेहान अहमद 102 वे ओव्हर टाकायला आला. यादरम्यान षटकातील चौथ्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने शॉट मारला आणि एकेरी धाव घेतली. या वेळी त्याने मोठी चूक केली. अश्विन खेळपट्टीच्या मधून पळत गेला.

कोणत्याही खेळाडूला विकेटच्या मधून पळण्याची परवानगी नाही, यामुळे खेळपट्टी खराब होते. असे असूनही, अश्विनने एकेरी घेण्यासाठी खेळपट्टीच्या मधून पळाला, त्यामुळे पंच जोएल विल्सन यांनी भारतीय संघावर 5 धावांचा दंड ठोठावला.

India handed five-run penalty England to start its innings with 5/0 r Ashwin running on pitch cricket news in marathi
T20 World Cup : BCCI चे सचिव जय शाह यांच्याकडून शिक्कामोर्तब! टी-20 वर्ल्ड कपमध्ये 'हा' दिग्गज खेळाडू असणार संघाचा कोच

आता जेव्हा इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरेल तेव्हा त्यांना 5 मोफत धावा मिळतील. इंग्लंडचा डाव 5-0 ने सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत अश्विनची एक छोटीशी चूक संपूर्ण संघाला महागात पडली आहे.

हा सामना जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो मालिकेत 2-1 अशी आघाडी घेईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका अद्याप अनिर्णित राहिली आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने भारताला धक्का दिला. यानंतर भारताने मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही दमदार पुनरागमन करत विशाखापट्टणम कसोटी जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com