IND vs NZ: 'न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापेक्षा रोहित अन् विराटने रणजी क्रिकेट खेळावी...'

एकदिवसीय मालिका जिंकलेली आहे त्यामुळे रोहित अन् विराटने...
Rohit Sharma Virat Kohli play ranji trophy
Rohit Sharma Virat Kohli play ranji trophysakal

India vs New Zealand ODI : न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकलेली आहे, त्यामुळे तिसऱ्या सामन्याला महत्त्व नाही. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी सराव करण्याकरिता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पुढच्या आठवड्यातील रणजी सामन्यात खेळावे, असे मत माजी कसोटीपटू वासिम जाफरने व्यक्त केले आहे. (Rohit Sharma Virat Kohli play ranji trophy)

Rohit Sharma Virat Kohli play ranji trophy
Sarfaraz Khan: अर्जुन किती नशीबवान! सरफराज वडिलांना म्हणतो तो तर...

भारत-न्यूझीलंड मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी होत आहे आणि रणजी स्पर्धेतील अखेरचे साखळी सामनेही मंगळवारी सुरू होत आहेत, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे.

विराट कोहली आणि केएल राहुल अखेरचा कसोटी सामना डिसेंबर २०२२ मध्ये खेळले आहेत, तर रोहित शर्मा त्याचा अखेरचा कसोटी सामना मार्च २०२२ मध्ये खेळलेला आहे. चेतेश्वर पुजारा आणि जयदेव उनाडकट हे कसोटी खेळाडू सौराष्ट्रकडून अगोदरच रणजी सामन्यात खेळत आहेत; तर तंदुरुस्ती सिद्ध edकरण्यासाठी रवींद्र जडेजाही सौराष्ट्र संघातून खेळणार आहे.

Rohit Sharma Virat Kohli play ranji trophy
Hockey World Cup: स्वप्न भंगले! यजमान भारत हॉकी विश्वचषकातून बाहेर

कसोटी सामन्यापूर्वी रणजी सामन्यात खेळणे फार महत्त्वाचे आहे. कदाचित एक किंवा दोन डाव तुम्हाला खेळायला मिळतील, पण त्याचा फायदा निश्चितच होईल. तुम्ही कितीही मोठे खेळाडू असा; परंतु कसोटी सामन्यासाठी रेड बॉलवरील सराव महत्त्वाचा असतोच, असे जाफर म्हणतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका भारतासाठी सर्वार्थाने महत्त्वाची आहे. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळण्यासाठी ही मालिका जिंकणे किंवा बरोबरीत सोडवणे आवश्यक आहे. त्याकरिता सर्व खेळाडूंचा कसोटीसाठीचा सराव महत्त्वाचा आहे.

Rohit Sharma Virat Kohli play ranji trophy
T20 WC IND vs SL: टीम इंडियाच्या सेमीफायनलमध्ये आशा जिवंत! लंकेला चारली पराभवाची धूळ

भरतलाही रणजी खेळू द्या

यष्टिरक्षक-फलंदाज केएस भरत एकदिवसीय संघात आहे, पण त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात खेळायची संधी मिळणे कठीण आहे. त्यामुळे त्यालाही आंध्रकडून रणजी खेळण्यासाठी मुक्त करावे, असे जाफरने सुचवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी रिषभ पंत संघात नसल्यामुळे ईशान किशन आणि केएस भरत यांची निवड करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com