IND vs SA : पहिला टी-20 रद्द झाल्याने टीम इंडियाच्या वाढल्या अडचणी! World Cup साठी फक्त 5 सामने बाकी...

IND vs SA : पहिला टी-20 रद्द झाल्याने टीम इंडियाच्या वाढल्या अडचणी! World Cup साठी फक्त 5 सामने बाकी...

India vs South Africa Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील डर्बनमधील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पहिला टी-20 रद्द झाल्याने भारतासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण आता भारतीय संघाचे 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपूर्वी फक्त 5 टी-20 सामने शिल्लक आहेत. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 आधी टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये जाण्यासाठी एकूण 6 टी-20 सामने होते, त्यापैकी एक रद्द झाला आहे.

IND vs SA : पहिला टी-20 रद्द झाल्याने टीम इंडियाच्या वाढल्या अडचणी! World Cup साठी फक्त 5 सामने बाकी...
WPL 2024 : महाराष्ट्र नव्हे तर गुजरातमध्ये होणार WPL चे सामने? BCCI सचिव जय शहा स्पष्ट बोलले

आफ्रिका दौऱ्यानंतर, टीम इंडिया जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. जी 2024 टी-20 वर्ल्ड कपपूर्वीची शेवटची मालिका असणार आहे. वर्ल्ड कपपूर्वी टी-20 फॉरमॅटमध्ये कमी सामने खेळणे टीम इंडियासाठी कठीण होऊ शकते.

अलीकडेच, भारतीय संघ 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाला कोणत्याही किंमतीत टी-20 वर्ल्ड कप जिंकायचा आहे.

IND vs SA : पहिला टी-20 रद्द झाल्याने टीम इंडियाच्या वाढल्या अडचणी! World Cup साठी फक्त 5 सामने बाकी...
IND W vs ENG W : श्रेयांका, स्मृतीच्या खेळीमुळे टीम इंडिया व्हाईट वॉशपासून वाचली

टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया कोणतीही कसर सोडू इच्छित नाही, त्यासाठी तयारी सर्वात महत्त्वाची असेल. अशा स्थितीत टीम इंडियाचे पुढील पाच सामने महत्वाचे असतील. मात्र, वर्ल्ड कपपुर्वी आयपीएल 2024 खेळवण्यात येणार आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचे खेळाडू वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळतील. टी-२० फॉरमॅटमध्ये खेळली जाणारी आयपीएल भारतीय खेळाडूंसाठीही फायदेशीर ठरू शकते.

टीम इंडिया 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने पराभूत झाली होती. यावेळी, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळल्या जाणार्‍या 2024 टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला कोणतीही चूक करायची नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडियाने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com