Ind vs Ban : राहुलच्या 'गोलीगत' थ्रोने मॅच फिरवली; दुखरी नसचं ठरली विजयाचे कारण

सामन्याचा खरा हिरो पाऊस -
 KL Rahul’s Direct Hit
KL Rahul’s Direct Hit sakal

India vs Bangladesh T20 World Cup : टीम इंडियासमोर बांगलादेशने टी-20 विश्वचषक 2022 च्या सामन्यात गुडघे टेकले आहेत. अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 6 गडी गमावून 184 धावा केल्या आणि बांगलादेशला 185 धावांचे लक्ष्य दिले. पण बांगलादेशच्या सातव्या षटकांत पाऊस आला आणि त्यांना 16 षटकांत विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य देण्यात आले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 16 षटकांत 6 गडी बाद 145 धावाच करू शकला, भारताने हा सामना 5 धावांनी (DLS पद्धती) जिंकला. टीम इंडिया आता 6 गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. ही आहे टीम इंडियाच्या विजयाची पाच कारणे....

विजयाची कारणे

  • दबावात गोलंदाजी खुलली -

    पावसानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. मोहम्मद शमीने 10व्या षटकात केवळ 4 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. यानंतर अर्शदीपने 12 व्या षटकात अफिफ आणि शाकिबचे विकेट घेत बांगलादेशचे कंबरडे मोडले. या षटकातून फक्त 2 धावा आल्या. पुढच्याच षटकात हार्दिकने फक्त 7 धावा दिल्या आणि आणखी 2 बळी घेतले. त्यानंतर अखेरच्या षटकात युवा अर्शदीपने 14 धावा देत भारताला विजय मिळवून दिला.

  • विराट कोहलीचा धडाका -

    रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक ही भारताची मोठमोठी नावं आपल्या लैकिकास साजेसा खेळ करू शकली नाही. अखेर भारताची रन मशिन पुन्हा एकदा भारतासाठी उभी राहिली. विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करत भारताला 184 धावांपर्यंत पोहचवले. 

  • केएल राहुलची फिफ्टी -

    केएल राहुलचा फॉर्म भारतीय संघासाठी एक अडचण ठरत होती, पण अॅडलेडमध्ये राहुल फॉर्ममध्ये परतला आहे. या सामन्यात फलंदाजी करताना राहुलने 32 चेंडूत 156.25 च्या स्ट्राईक रेटने 50 धावा केल्या, यादरम्यान त्याच्या बॅटमध्ये 3 चौकार आणि 4 षटकार दिसले.

  • सामन्याचा खरा हिरो पाऊस -

    भारताकडून मिळालेल्या लक्ष्याला पाठलाग करताना बांगलादेशने जबरदस्त सुरुवात केली. लिटन दासने अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक झळकावले. बांगलादेशने 7 षटकांत एकही विकेट न गमावता 66 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ती डकवर्थ लुईस नियमानुसार 17 धावांनी पुढे होती. म्हणजेच सामना पुन्हा सुरू झाला नसता तर बांगलादेश जिंकला असता. नशिबाने भारताला साथ दिली आणि सामना पुन्हा सुरू झाला, त्यानंतर बांगलादेशला पुढच्या 9 षटकात 85 धावा करायच्या होत्या आणि येथे मोठे शॉट्स खेळण्याच्या प्रयत्नात संघाने विकेट गमावल्या.

टर्निंग पाईंट

  • राहुलचा थ्रो -

    लिटन दास भारतीय गोलंदाजांविरुद्ध 226.92 च्या स्ट्राईक रेटने धावा करत होता. त्याने स्फोटक शैलीत 59 धावा केल्या. त्याला रोखणे भारतीय प्रत्येक गोलंदाजांसाठी कठीण झाले होते. परंतु पावसानंतर सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा राहुलच्या रॉकेट थ्रोने लिटन दास माघारी गेला. केएल राहुलने फलंदाजीपाठोपाठ क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी करून दाखवली. टीम इंडियासाठी हा मॅचचा टर्निंग पॉइंट होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com