इंदौर : वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करून कॅप्टन विराट कोहलीची शाबासकी मिळवणाऱ्या मुंबईच्या शार्दुल ठाकूरनं आज, श्रीलंकेविरुद्धही चमकदार कामगिरी केली. त्यानं तीन बळी घेत श्रीलंकेला 150 धावांच्या आत रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्याला नवख्या सैनीनं चांगली साथ दिली. त्यानं केवळ 18 धावा देत श्रीलंकेचे दोन फलंदाज माघारी पाठवले.
गुवाहटीचा पहिला सामान पावसात वाया गेल्यानं आज, इंदौरमधल्या सामन्याकडं भारतीय क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. त्यातच आज इंदौरमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं चिंता वाढली होती. पण, सामना वेळेत सुरू झाला आणि चाहत्यांना जीव भांड्यात पाडला. पहिल्या सामन्या प्रमाणं विराटनं इथंही टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. वॉशिंग्टन सुंदरनं कॅप्टन कोहलीचा विश्वास सार्थ ठरवत श्रीलंकेची सलामीची जोडी फोडली. त्यानं सलामीवीर फेर्नांडोला माघारी धाडलं. त्यानंतर कुलदीपनं दोन आणि सैनीनं दोन बळी घेऊन श्रीलंकेचं कंबरडं मोडलं. पुढच्या तीन फलंदाजांना घरचा रस्ता दाखवत शार्दुलनं टीम इंडियाचं काम सोपं केलं.
गोलंदाजांच्या या चमकदार कामगिरीमुळं टीम इंडियानं श्रीलंकेला 142 धावांवर रोखलंय. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळं श्रीलंकेला दीडशतकी मजलही मारता आली नाही. त्यांच्या तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या परेरानं सर्वाधिक 34 धावा केल्या. शार्दुल ठाकूरनं 23 धावा देऊन तीन बळी घेतले तर, कुलदीप यादवनं 38 धावा देत दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. वॉशिंग्टन सुंदर (1), सैनी (2) आणि बुमराह (1) यांनी शार्दुलला चांगली साथ दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.