Rohit Sharma : पहिला विजय स्पेशल; रोहित शर्माची प्रतिक्रिया

मुंबई इंडियन्सने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स संघावर अखेरच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला.
Rohit Sharma
Rohit SharmaSakal
Summary

मुंबई इंडियन्सने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स संघावर अखेरच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला.

नवी दिल्ली - मुंबई इंडियन्सने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स संघावर अखेरच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला. मुंबई इंडियन्सला पहिल्या दोन लढतींत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या विजयाचे महत्त्व अधिक आहे. कर्णधार रोहित शर्मा यानेही हा विजय स्पेशल असल्याचे उद्‌गार लढतीनंतर काढले.

आयपीएल सुरू होण्याआधी मुंबईत आमच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आम्ही मेहनत घेत आहोत. अखेर तिसऱ्या लढतीत मनाजोगता निकाल लागला. यंदाच्या मोसमातील पहिला विजय स्पेशल होता, असे रोहित आवर्जून म्हणाला.

दिल्लीविरुद्धच्या लढतीत लेगस्पिनर पियूष चावला याने तीन विकेट बाद केले. तसेच हृतिक शोकीन या फिरकी गोलंदाजानेही ठसा उमटवला. याबाबत रोहित म्हणाला, आम्ही नवी दिल्लीतील स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळलो, पण या लढतीसाठी वापरण्यात आलेली खेळपट्टी वेगळी होती. फिरकी गोलंदाज या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करू शकत होते. फिरकी गोलंदाजांनीच आम्हाला विजयाची आस दाखवली, असे रोहित स्पष्टपणे म्हणाला.

धावांचा पाठलाग करताना मिळालेल्या यशाबद्दल रोहित म्हणाला, या लढतीत चांगली फलंदाजी करणे आवश्‍यक होते. पॉवर-प्लेमध्ये आक्रमक फटकेबाजी करण्याला प्राधान्य दिले. तिलक वर्मासोबतही महत्त्वाची भागीदारी करण्यात यश मिळाले. फलंदाजी विभागात सर्वांनी आपली कामगिरी चोख बजावली, अशा शब्दांत रोहितने संघसहकाऱ्यांचे कौतुक केले.

अक्षरने अव्वल चारमध्ये फलंदाजी करावी - वॉर्नर

दिल्ली संघाला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सलग चार लढतींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मात्र अक्षर पटेल या अष्टपैलू खेळाडूने फलंदाजीत वारंवार आपली चमक दाखवली आहे. यावर कर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणाला, पहिल्या काही सामन्यांमध्ये अक्षर पटेल याने छान फलंदाजी केली आहे. त्यामुळे पुढील सामन्यांसाठी त्याला अव्वल चार क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा विचार करावा लागणार आहे, असे त्याला वाटते.

शास्त्रींकडून रोहितचे कौतुक

भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक केले. ते म्हणाले, रोहितने दिल्लीविरुद्धच्या लढतीत दबावाखाली दमदार फलंदाजी केली. त्याने सामना जिंकून देणारी खेळी साकारली. यामुळे मुंबई इंडियन्सचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला असेल. भविष्यातील लढतींसाठी रोहितची ही खेळी प्रेरणा देणारी ठरेल, असे शास्त्री यांना वाटते. दरम्यान, रोहित शर्मा यानेे दिल्लीविरुद्धच्या लढतीत अर्धशतक झळकावत मुंबईला विजय मिळवून दिला. त्याने तब्बल दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतकी खेळी साकारली आहे. २४ डावांनंतर त्याला आयपीएलमध्ये शतक साजरे करता आले आहे. याचा अर्थ रोहितसाठी ही खेळी खूप महत्त्वाची होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com