बंगळूर : आयपीएलमध्ये प्रत्येक संघ मोठी धावसंख्या उभारण्याचे लक्ष्य ठेवतो, त्यांचे हे उद्दिष्टच गोलंदाजांसाठी संधी निर्माण करत असते, असे मत बंगळूर संघाचा वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूडने व्यक्त केले..मोठे लक्ष्य ठेवल्यावर प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावे लागते, अशावेळी काही चेंडूंवर धावा मिळाल्या नाही तर फलंदाज चुका करतो, त्यामुळे त्याला बाद करण्याची अधिक संधी निर्माण होते, असे हेझलवूडचे म्हणणे आहे..IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण.या आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या २३ सामन्यांपैकी २१ लढतींत द्वशतकी धावा करण्यात आल्या आहेत. प्रत्येक चेंडू सीमापार झालेला पाहणे प्रेक्षकांना आवडत असते. आता तर २३० धावा करण्याचे उद्दिष्ट ठेवले जात आहे, असे हेझलवूड म्हणतो..सहा चेंडूंत दोनच धावा देण्यात आल्या आणि त्याला चौकार-षटकार मारण्यात आला नाही तर फलंदाज अडचणीत येत असतो, तरीही पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते, असे त्याने नमूद केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.