IPL 2024 CSK vs MI : धोनीनेही मोठ्या चुका केल्या रोहितने मात्र नाही... माजी भारतीय विकेटकिपर हे काय बोलून गेला?

Rohit Sharma MS Dhoni
Rohit Sharma MS Dhoniesakal

IPL 2024 Rohit Sharma MS Dhoni Best Captain : आयपीएलचा नवा 17 वा हंगाम सुरू होत आहे. या हंगामात जरी चर्चा हार्दिक पांड्या अन् रोहित शर्माची होत असली तरी चांगला कर्णधार कोण ही तुलना सीएसकेचा थला धोनी आणि मुंबईचा रोहित शर्मा यांच्यातच होते. भारताची माजी विकेटकिपर पार्थिव पटेलने रोहित शर्मा आणि धोनीच्या कॅप्टन्सीची तुलना केली आहे. यावेळी पार्थिव पटेलने रोहितच्या कॅप्टन्सीला झुकतं माप दिलं आहे.

Rohit Sharma MS Dhoni
IPL 2024 Schedule Live Streaming : रोहित-पांड्या ते अय्यर-पंत, हंगाम होणार जबरदस्त; सामने 'इथं' पाहता येणार फ्री

जिओ सिनेमाशी बोलताना पार्थिव पटेल म्हणाला की, 'मुंबईच्या कूल कॅप्टनचे उदाहरण देण्यासाठी दोन सामने पुरेसे आहेत. हे दोन सामने मुंबईने फक्त एका धावेने जिंकले आहेत. हे मैदानावर शांत कॅप्टन असल्याशिवाय शक्य होणार नाही.'

'ज्यावेळी सामन्यात मोठा दबाव असतो त्यावेळी आपण चुकीचे निर्णय घेणे आणि ब्लंडर करण्याची शक्यता जास्त असते. मात्र रोहितची गेल्या 10 वर्षातील कॅप्टन्सी पाहिली तर त्याने अशा चुका केल्याचे आपल्याला आठवत नाही.

पार्थिव पटेल पुढे म्हणाला की, 'धोनीनेही दबावाच्यावेळी चुका केल्याचे आपण पाहिले आहे. त्याने पवन नेगीला ओव्हर देण्याची चूक केली होती. मात्र रोहित अशी चूक करताना कधी दिसला नाही. प्रक्रिया सोपी ठेवा असा धोनीचा सल्ला असतो. मात्र रोहित प्रत्यक्ष सामन्यात हा सल्ला वापरताना दिसतो.'

Rohit Sharma MS Dhoni
Virat Kohli: 'जर बेंगळुरु IPL जिंकले तर...', विराट कोहली नक्की काय म्हणाला?

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानने देखील रोहित परिस्थितीनुसार आपल्यात बदल करतो आणि परिस्थितीनुसार आपले निर्णय घेतो असं सांगितलं. जहीर म्हणाला, 'तुम्ही आधीच सामन्यासाठी प्लॅन करू शकता. मात्र मैदानात परिस्थिती कधी अन् कशी बदलेल हे सांगता येत नाही. परिस्थितीनुसार तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय आपण आधी ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे नसतात.'

'परिस्थितीनुसार त्याक्षणाला निर्णय घेण्याची क्षमता रोहितकडे आहे ती त्याची ताकद आहे. त्या क्षणाला निर्णय घेणे हे खूप मोठे आव्हान असते. त्याने मुंबई इंडियन्ससाठी ते उत्तम प्रकारे केले आहे.'

पार्थिवने सांगितले की, 'रोहितचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो खेळाडूंना पाठिंबा देतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह. बुमराह हा 2014 मध्ये मुंबईच्या संघात आला 2015 मध्ये त्याची कामगिरी तेवढी चांगली नव्हती. मुंबई बुमराहला अर्ध्या हंगामातून परत पाठवण्याचा गांभिर्याने विचार करत होते. मात्र रोहितने त्याच्यावर विश्वास ठेवला अन् 2016 च्या हंगामात त्याला खेळले. त्याने दमदार कामगिरी करून दाखवली.'

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com