मुंबई : जागतिक तिरंदाजी संघटनेने आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धेसाठी भारताकडून आलेल्या प्रवेशिका पूर्ण नाहीत, असे सांगून त्या फेटाळल्या आहेत. आता या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्यासाठी गुरुवारी सकाळपर्यंतची मुदत दिली आहे.
या स्पर्धेच्या प्रवेशिका पाठवण्याची मुदत मंगळवारी संपली होती; पण भारतीयांच्या प्रवेशिका अपूर्ण आहेत. मात्र भारतीय तिरंदाजीतील प्रश्न लक्षात घेऊन आपण गुरुवार सकाळपर्यंत मुदत देत आहोत, असे जागतिक संघटनेने भारतीय ऑलिंपिक संघटनेस कळवले आहे.
आता भारतीय ऑलिंपिक संघटनेने याबाबत निर्णय घेण्यास भारतीय तिरंदाजीतील दोन समांतर संघटनांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्याची सूचनाही भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिदंर बत्रा यांनी केली आहे. आता याबाबतचा निर्णय गुंजन ऍब्रॉल, बी. व्ही. पी. राव आणि विरेंद्र सचदेव यांच्याकडे त्यांनी सोपवला आहे.
|