Rahul Dravid : "हनिमून पिरियड संपला" राहुल द्रविडवर टीम इंडियाच्या माजी विकेटकिपरची टीका

भारतीय क्रिकेट संघाला यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. मात्र याआधी राहुल द्रविड नेतृत्वाखाली भारतीय संघासाठी आशिया कप मध्ये काही चांगली कामगिरी करता आली नाही.
Rahul Dravid Team India
Rahul Dravid Team India

Rahul Dravid Team India : भारतीय क्रिकेट संघाला यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. मात्र याआधी आशिया कप मध्ये भारतीय संघासाठी काही चांगली राहिली नाही. सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर पडली. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्यानंतर आशिया कप ही त्यांच्या प्रशिक्षक कार्यकाळातील पहिली मोठी स्पर्धा होती. यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला काही चांगली कामगिरी करता आली नाही. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या माजी विकेटकिपर खेळाडू सबा करीमने द्रविडवर टीका केली आहे.

Rahul Dravid Team India
Asia Cup नंतर स्पष्ट, रोहित 'या' फ्लॉप खेळाडूंना T-20 World Cup साठी देणार संधी

साबा करीम एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, राहुल द्रविडसाठी आता कोठे कठीण काळ सुरू झाला आहे. राहुल द्रविडला देखील माहित आहे की आता त्यांचा हनिमून पिरियड संपला आहे. तो परिपूर्ण संघ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आतापर्यंत तो असं करताना दिसला नाही.

साबा करिबने आपल्या वक्तव्यात राहुल द्रविड आपली कोचिंग कारकीर्द कशी यशस्वी करू शकतो हे देखील सांगितले. राहुल हा अतिशय हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आहे. त्याला माहीत आहे की जर त्याला आपले कोचिंग यशस्वी करायचे असेल तर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध कसोटी मालिका जिंकणे हा एक पर्याय आहे. मी फक्त कसोटी जिंकण्याबद्दल बोलत नाही. राहुल द्रविड जेव्हा खेळाडू म्हणून खेळायचा तेव्हाही हे घडायचे. पण जर भारतीय संघाने या देशांमध्ये कसोटी मालिका जिंकली तर कुठेतरी राहुल द्रविड संघाच्या कामगिरीवर खूप खूश असेल.

Rahul Dravid Team India
Video : अफगाण चाहत्यांचा पाकला चोप तर भारताची गळाभेट

ऑस्ट्रेलिया संघाला आता भारत दौऱ्यावर यायचे आहे. येथे 20 सप्टेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिका संघही भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन दिवसांच्या अंतरानंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिका खेळायची आहे. यानंतर भारतीय संघाला ५ दिवसांचा ब्रेक मिळणार आहे. यामध्ये टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com