
Ranji Trophy: केदार जाधवचे त्रिशतक १७ धावांनी हुकले! ३३ चेंडूत ठोकल्या १५६ धावा
Ranji Trophy Kedar Jadhav : ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांची भारतीय संघात निवड झालेली असल्यामुळे महाराष्ट्राच्या रणजी संघात तीन वर्षांनी खेळण्याची संधी मिळालेल्या केदार जाधवने जवळपास त्रिशतक झळकावलेच होते; परंतु त्याच्या आक्रमक खेळीला २८३ धावांवर ब्रेक लागला. या खेळीत २१ चौकार आणि १२ षटकार मारले, आणि ३३ चेंडूत १५६ धावा ठोकल्या. आसामविरुद्धच्या या रणजी सामन्यात महाराष्ट्राने ५९४ धावांचा डोंगर उभा केला.
हेही वाचा: IND vs SL : अक्षर - मावी शेवटपर्यंत झुंजले मात्र लंकेचा कर्णधार आला विजयाचा आडवा
महाराष्ट्राने पहिल्या डावात त्रिशतकी आघाडी घेतली असून आता त्यांनी निर्णायक विजयासाठी प्रयत्न सुरू केले परंतु आसामने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद ६५ अशी सुरुवात केली. अजून ते २५५ धावांनी पाठीमागे आहेत आणि आज अखेरचा दिवस आहे.
महाराष्ट्राची २ बाद ९५ अशी स्थिती असताना केदार फलंदाजीस आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केदार १४४ धावांवर नाबाद होता. आज तिसऱ्या दिवशी १८७ चेंडूंत १८३ धावांची खेळी केल्यानंतर तो काही काळासाठी जखमी निवृत्त झाला.
हेही वाचा: No Ball Free Hit : 7 नो बॉलवर 33 धावांची लयलूट! हार्दिक म्हणाला गुन्हाच केला...
महाराष्ट्राचा चौथा फलंदाज बाद झाल्यावर केदार पुन्हा फलंदाजीस आला आणि त्याने चेंडूमागे एक धाव या गतीने २८३ धावांपर्यंत मजल मारली. या खेळीत त्याने २१ चौकार आणि १२ षटकारांची आतषबाजी केली. त्रिशतक १७ धावांनी दूर असताना तो रियान परागच्या चेंडूवर बाद झाला.
२०१८ नंतर केदारचे हे प्रथम श्रेणीतील पहिले शतक आहे. २०१३-१४ मध्ये रणजी क्रिकेट मोसम गाजवल्यानंतर त्याचे हे पहिले द्विशतक ठरले आहे. २०१२-१३ च्या मोसमात केदारने उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात ३२७ धावांची खेळी केली होती.