Rishabh Pant vs Dinesh Karthik T20 World Cup : आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर निवडकर्त्यांसमोर टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड करण्याचे आव्हान आहे. विश्वचषकासाठी टीम इंडिया मध्ये ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोणाला संघात स्थान मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने मात्र पंत आणि कार्तिक या दोघांनाही टी-20 विश्वचषकासाठी संघात निवडण्याचा सल्ला दिला आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी दिनेश कार्तिकची निवड केली होती, तर ऋषभ पंतला बाहेर बसावे लागले होते. दोन सामन्यांनंतर दिनेश कार्तिकला वगळण्यात आले तेव्हा अनेकांनी कार्तिकला वगळण्याच्या भारताच्या निर्णयावर टीका केली. बॅटिंग लाइनअप मजबूत करण्यासाठी पंत आणि कार्तिक दोघांचेही संघात असणे आवश्यक असल्याचे पुजाराचे मत आहे.
एक वृत्तसंस्थेशी बोलताना चेतेश्वर पुजाराने म्हणाला की, मला वाटते की 5, 6 आणि 7 क्रमांक निवडायचा असेल तर मी दोघांसोबत जाईन. आशिया चषक टीम इंडियासाठी ज्या प्रकारे गेला, त्यावरून असे दिसते की टीमची फलंदाजी मजबूत करण्याची गरज आहे. ऋषभसोबत पाचव्या, हार्दिकसोबत सहाव्या क्रमांकावर आणि डीकेसोबत सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताची फलंदाजी खूप मजबूत होईल. पंत आणि कार्तिक या दोघांनाही संघात ठेवण्याची गरज आहे. अशा स्थितीत हुड्डा यांना पाचव्या क्रमांकावर ठेवायला हवे.
रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनासमोर आणखी एक समस्या उभी राहिली आहे, कारण तो फिनिशरची भूमिका बजावत होता. आशिया चषकानंतर टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे सेट झालेला दिसत आहे. रोहित शर्मासोबत केएल राहुल सलामीची जबाबदारी सांभाळणार. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. असेही होऊ शकते की भारताने पंतला पाचव्या क्रमांकावर ठेवावे आणि रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.