Rohit Sharma-Virat Kohli’s Future
esakal
तंदुरुस्ती, फॉर्म आणि प्रबळ इच्छाशक्ती यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे २०२७ मधील विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या तिन्ही घटकांची चाचणी येत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत होणार आहे, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
२०१७ ते २०२१ या कालाखंडात भारताचे प्रशिक्षक राहिलेल्या रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कोहलीप्रमाणे रोहितही अधिक सक्षम झाले होते. ते म्हणतात या दोघांनाही भारताच्या एकदिवसीय संघातले आपले स्थान कायम ठेवायचे असेल, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोस कामगिरी करावीच लागेल.