Gautam Gambhir: फायनलचा बादशाह गंभीर! टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ‘७-०’ चा चमत्कार; गंभीरची क्रिकेट इतिहासात अतुलनीय कामगिरी

Gautam Gambhir News: टीम इंडिया तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. यामुळे गौतम गंभीर खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून प्रत्येकी दोन आयसीसी जेतेपदे जिंकणारा पहिला क्रिकेटपटू बनला आहे.
Gautam Gambhir

Gautam Gambhir

ESakal

Updated on

भारताने तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून टीम इंडियाने इतिहास रचला. भारत T20 विश्वचषक ट्रॉफीचे रक्षण करणारा पहिला देश ठरला. T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २५५ धावा केल्या. T20 World Cup फायनलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या होती. भारताकडून संजू सॅमसनने सर्वात मोठी खेळी केली. ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८९ धावा केल्या. याबरोबरच गौतम गंभीरने मोठा विक्रम रचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com