

IND vs ENG
esakal
चेल्म्सफोर्ड : भारत-इंग्लंड यांच्यामध्ये गुरुवारपासून (ता. २८) तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. १२ जूनपासून इंग्लंड व वेल्स या देशांमध्ये महिलांच्या टी-२० विश्वकरंडकाला सुरुवात होणार असून, त्याआधी होत असलेली टी-२० मालिका ही रंगीत तालीम असणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला या मालिकेमधून खेळामध्ये सातत्य राखण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागणार आहे.