
सुहृद वार्डेकर आणि रसिका वाखारकर
‘कलर्स मराठी’वरील ‘अशोकमामा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी ‘भैरवी’ आणि ‘अनिश’ ही जोडी मालिकेबाहेरही एकमेकांशी मैत्रीचं घट्ट नातं जोडून आहे. या दोघांची पहिली ओळख मालिकेच्या ‘लूक टेस्ट’दरम्यान झाली. पहिल्याच भेटीत संवादाने इतकी सहजता गाठली, की मैत्रीचा एक बंध तयार झाला. अभिनयाच्या प्रवासात एकत्र काम करताना निर्माण झालेलं हे नातं आज त्यांच्या आयुष्यातील मौल्यवान नात्यांपैकी एक झालं आहे.
रसिका सांगते, “लूक टेस्टच्या वेळी आम्ही खूप मोकळेपणाने बोललो. अशा ‘प्रोफेशनल सेटअप’मध्ये पहिल्याच भेटीत इतका सहज संवाद साधणं माझ्यासाठी नवीन होतं. त्यानंतर आमच्यातली ओळख हळूहळू छान मैत्रीत रूपांतरित झाली.”