Mumbai Happiest City: कधीच न झोपणारी मुंबई ठरली ‘हॅप्पिएस्ट सिटी’! आनंदी शहरांच्या यादीत मिळाला पाचवा क्रमांक

Time Out Happiness Index India: कधीच न झोपणारी, उत्साहाने भरलेली मुंबई आता भारतातील सर्वात आनंदी शहर ठरली असून, टाइम आऊट सर्व्हेनुसार जागतिक यादीत पाचव्या स्थानी पोहोचली आहे.
Updated on

Top Happiest Cities in the World List: कधीच न झोपणारं, सतत धावत असणारं, प्रत्येक मोठ्या संकटातही खंबीरने उभं असलेलं आणि स्वप्नांची नागरी किंवा सिटी ऑफ ड्रीम्स म्हणून मुंबई शहराची सगळ्यांनाच ओळख आहे. आणि आता या सगळ्यांच्याच आवडीच्या मुंबईने अजून एक किताब मिळवला आहे. मुंबई आता भारतातील सर्वात आनंदी शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 'टाइम आउट' या आंतरराष्ट्रीय सर्वेनुसार, यंदाच्या वर्षी मुंबई हे भारतातील सर्वात आनंदी शहर (Happiest City in India) ठरलं असून, जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com