नातीगोती : ‘पहिलं प्राधान्य कुटुंबाला’

कुटुंबव्यवस्था म्हणजे फक्त काही माणसांनी मिळून एकत्र राहणं नव्हे. आपण कुटुंबासोबत असतो, तेव्हा एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांना आधार देतो आणि एकमेकांवर अवलंबून असतो.
Family
FamilySakal

- विजयलक्ष्मी माल्या

कुटुंबव्यवस्था म्हणजे फक्त काही माणसांनी मिळून एकत्र राहणं नव्हे. आपण कुटुंबासोबत असतो, तेव्हा एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांना आधार देतो आणि एकमेकांवर अवलंबून असतो. कारण, आपलं कुटुंब हेच आपल्यासाठी सर्वकाही आहे.

मी माझ्या कुटुंबाशी भावनिकतेनं जोडली आहे. माझ्या सर्वांत जवळची व्यक्ती म्हणजे माझा छोटा भाऊ प्रियेश. प्रियेशचा सर्वांत छान गुण म्हणजे त्याचा दयाळूपणा, प्रेमळपणा आणि प्रामाणिकपणा. मला आठवतं, लहानपणी जेव्हा त्याचा जन्म झाला आणि जेव्हा मी त्याला माझ्या हातात पहिल्यांदा घेतलं, तो क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय क्षण होता.

माझ्या कुटुंबानं मला सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली आहे आणि पाठिंबा दिला आहे. माझं गाव उत्तर प्रदेशात आहेत. तिकडे मुलींना प्राधान्य दिलं जातं; पण काही ठिकाणी अजूनही मुलींना आव्हानांचा सामना करावा लागतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, मला खूप छान कुटुंब मिळालं आहे, ज्यांनी मला माझ्या सगळ्या निर्णयांमध्ये साथ दिली आहे आणि माझ्या पाठीशी सर्वजण खंबीरपणे उभे राहिले आहेत.

मी सध्या ‘अँड टीव्ही’वर ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत मर्यादा हिची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे चित्रीकरणासाठी मी मुंबईत राहते आणि माझे पूर्ण कुटुंबीय गावी राहतात. मी त्यांना भेटायला जाते, तेव्हा आम्ही खूप मज्जा-मस्ती आणि गप्पागोष्टी करतो. एकत्र वेळ घालवतो. जेव्हा मी त्यांना सोडून मुंबईत येते, तेव्हा मला खूप भावुक व्हायला होतं.

माझ्या करिअरची सुरवात मॉडेलिंगमध्ये झाली. या गोष्टी माझ्या वडिलांना आधी माहिती नव्हत्या; पण माझ्या आईला मी सगळं सांगायची आणि तिनं मला खूप पाठिंबा दिला आहे. माझे वडील खूप कडक स्वभावाचे होते. पण जेव्हा पहिल्यांदा त्यांनी माझा फोटो वृत्तपत्रात पाहिला, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी सगळ्या नातेवाईकांना व शेजाऱ्यांना ही गोष्ट अभिमानानं सांगितली. तो प्रसंग माझ्या स्मरणात नेहमीच राहील. नेहमी वागण्यात, बोलण्यात प्रेमळपणा ठेवावा आणि सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहावं. त्यामुळे नातेसंबंध चांगले राहतात.

नाती दृढ होण्यासाठी…

१) कुटुंबाला प्राधान्य द्यावं; कारण कुटुंब म्हणजे प्रत्येकासाठी सर्वकाही आहे.

२) सगळ्यांशी प्रेमानं वागावं.

३) कुठल्याही अडचणींत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं.

४) एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे, जास्तीत जास्त वेळ कुटुंबीयांसाठी द्यावा.

५) कुटुंबीयांमध्ये मिळून-मिसळून राहावं.

शब्दांकन : अरुण सुर्वे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com