Weight Loss Tips
Weight Loss Tipsesakal

Weight Loss Tips : फास्ट वजन कमी करण्यासाठी उरले फक्त १५ दिवस? हे बदल करा आणि फरक अनुभवा

काही लोक डायट करतात तेव्हा सायंकाळच्या छोट्या भुकेसाठी फास्ट फूड खातात

Weight Loss Tips :

ज्या लोकांना वजन कमी करायंच आहे त्यांच्यासाठी उन्हाळ्याहून अधिक चांगला ऋतू नाही. मे महिन्यातील कडक उन्हाळा संपायला फक्त १५ दिवस राहीले आहेत. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी या १५ दिवसात संधीचे सोनं करून घ्यावे.

कोल्हापुरातील फिटनेस कोच निलेश गिरीगोसावी सांगतात की, उन्हाळ्यात आपल्या शरीरातून जास्त घाम बाहेर पडतो. त्याचा फायदा वजन कमी करण्यात होतो. पण, केवळ उन्हामुळे घाम जातोय म्हणून निवांत राहून चालणार नाही. तर, त्यासाठी तुम्हीही मेहनत करावी लागेल. (Weight Loss Tips)

Weight Loss Tips
Weight Loss Fruits : वजन कमी करण्यासाठी डायट करताय तर खा ही फळे, लगेच फरक जाणवेल

उन्हाळ्याचे १५ दिवस राहीले आहेत. जर या १५ दिवसात तुम्ही काही गोष्टी पाळल्या तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. त्यामुळेच, उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी केल्याने वजन कमी होतं हे पाहुयात. 

व्यायामासाठी वेळ काढा

सर्वात आधी तर वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्ही व्यायाम किती करत आहात हे महत्त्वाचे ठरते. कारण, व्यायामासाठी आजकाल लोकांना वेळ मिळत नाही. पण दिवसातील ४५ मिनिटे तरी यासाठी वेळ काढायला हवा.

Weight Loss Tips
Weight Gain : वेळी अवेळी खाण्याचा आपल्या वजनावर काही फरक पडतो का?

तेलकट खाणं बंद

वजन कमी होण्यासाठी तुम्ही खाण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेच आहे. शरीरातील फॅट कमी होण्यासाठी व्यायाम कराच. पण ते वाढू नये यासाठी तेलकट पदार्थ, फास्टफूड असे खाणे बंद करा. तुम्ही उन्हाळ्यात तेलकट पदार्थ खाणे सोडले तर तुमचे वजन कमी होईल.

भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामामुळे तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. शरीराला पाणी कमी पडू देऊ नका. दिवसात ३–४ लिटर पाणी प्या. ज्यामुळे शरीरातील घाण निघून जाईल. आणि वजन कमी करण्यास मदत होईल. याचा अजून एक फायदा असा होतोय की, पाणी प्यायल्याने जेवण जास्त जाणार नाही.

Weight Loss Tips
Weight Loss: तुमची वजनवाढ नेमकी कशी होतेय? स्नायूंचे वजन वाढतेय की चरबी वाढतीये? डॉक्टर काय सांगतात पहा

भूक लागेल तेव्हा फळ-सॅलेड खा

काही लोक डायट करतात तेव्हा सायंकाळच्या छोट्या भुकेसाठी फास्ट फूड खातात. पण, हे वजनावर परिणाम करणारं ठरू शकतं. त्यामुळेच, जेव्हा छोटी भूक लागेल तेव्हा कलिंगड, टरबूज अशी पाणीदार फळ आणि साधं सॅलेड खा. याने शरीरातील अन्न पचायला मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com