Weight loss : वाढत्या वयामुळे महिलांना वजन कमी करण्यास अडचणी; काय आहेत या मागची कारणे? घ्या जाणून

वय वाढले की महिलांना वजन कमी करताना अनेक अडचणी येतात.
Weight loss
Weight lossesakal

Weight loss : वजन वाढण्याची समस्या दिवेसंदिवस वाढत चालली आहे. पुरूष-महिला आणि किशोरयवीन मुला-मुलींमध्ये वजन वाढण्याची समस्या वाढताना दिसत आहे. वजन वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

ज्यामध्ये, बदललेली आणि बिघडलेली जीवनशैली, रात्रीचे जागरण, जंक फूड्सचे अतिसेवन, हार्मोनल बदल इत्यादी अनेक कारणे असू शकतात. मात्र, हे वाढलेलं वजन कमी करणं हे वाटतं तितक सोप नक्कीच नाही. हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

महिलांना त्यांचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मात्र, तुम्ही कधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का ? की जसे महिलांचे वय वाढत जाते तसे त्यांना त्यांचे वजन कमी करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यामागे कोणती कारणे आहेत ? ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

स्नायूंची झीज होते

आपले वय वाढले की आपल्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. त्यामध्ये, मग स्नायूंचा ही समावेश आला. महिलांचे वय वाढले की, स्नायूंची झीज होऊ लागते. परिणामी, शरीरातील चरबी मोठ्या प्रमाणात वाढते आणि वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते.

खरं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करायला हवा. यासाठी तुम्ही जिमची मदत घेऊ शकता.

Weight loss
Health Care : हिवाळ्यात डिंकाचे सेवन करणे आरोग्यासाठी आहे लाभदायी, जाणून घ्या 'हे' फायदे

झोपेची वेळ

तुमची झोप जर चांगली झाली तर तुमचे आरोग्य चांगले राहते. झोपेवर आपल्या आरोग्याचे चक्र अवलंबून असते, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. जसे, महिलांचे वय वाढत जाते तसा त्यांचा स्लीप पॅटर्न देखील बदलत जातो.

काही जणांना तर ५-६ तासांची झोप सुद्धा येत नाही. हे सर्व वय वाढल्यामुळे होतं. त्यामुळे, तुमची झोप नीट झाली नाही तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. थोडक्यात कायं तर वजन वाढण्यामागे पुरेशी झोप न घेणे हे देखील महत्वाचे कारण आहे.

Weight loss
Health Care : मेनोपॉजची सुरुवात कशी ओळखाल? 'या' लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

हार्मोन्समध्ये बदल

महिलांच्या आयुष्यात अनेक टप्पे असतात. ज्यामुळे, महिलांच्या हार्मोन्समध्ये सतत बदल होत असतात. मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती हे महिलांच्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे आहेत. या टप्प्यांमध्येच महिलांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असतात.

मासिक पाळी, गर्भधारणेनंतर रजोनिवृत्तीचा टप्पा येतो. रजोनिवृत्ती ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. या टप्प्यातून प्रत्येक महिलेला जावे लागते. या टप्प्यात आल्यावर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. या काळात महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजेनची पातळी कमी होते. ही पातळी कमी झाल्यामुळे चरबीचे प्रमाण वाढते. ही चरबी वाढली की महिलांचे वजन वाढते.

Weight loss
Health Care : गरजेपेक्षा जास्त काजू खाणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक; कसे काय? घ्या जाणून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com