
Parenting During War in India vs Pakistan : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भारत सरकार नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. पंजाब आणि हिमाचलमध्ये अनेक शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे, ज्यामुळे नागरिकांनामध्ये चिंता वाढली आहे. शाळा बंद झाल्यामुळे, काही मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. पण मुलांना चुकीच्या मार्गाने जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्यांचे मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी, फक्त एकच गोष्ट त्यांना वाचवू शकते आणि ती म्हणजे शिस्त. जर युद्धजन्य परिस्थितीत मुलांना शिस्त लावायची असेल तर पालकांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.