Eknath Shinde : आता तिसऱ्याचा लाभ होणार नाही ; एकनाथ शिंदे,छत्रपती संभाजीनगरात जाहीर सभा
छत्रपती संभाजीनगर : ‘‘गेल्या वेळी या मतदार संघात थोडी गडबड झाली. पण, आता दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार नाही, याची काळजी घ्या. कामाला लागा’’, असे आवाहन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधकांवर टीका केली.
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची गुरुवारी क्रांतीचौक ते गुलमंडी फेरी झाली. नंतर फेरीचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेची डरकाळी छत्रपती संभाजीनगरात घुमली. लोकांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा आहे. गेल्यावेळी थोडी गडबड झाली. ही निवडणूक देशाच्या विकासासाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची उंची हिमालयाएवढी तर काँग्रेसची उंची टेकडीएवढीच आहे. देशात २०१४ पूर्वी दंगली, बाँम्बस्फोट घडत होते. मात्र, २०१४ नंतर कुणाची अशी हिंमत झाली नाही.’’
उद्धव ठाकरे सरड्यापेक्षा जास्त रंग बदलतात
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे हे सरड्यापेक्षा जास्त रंग बदलतात. धनुष्यबाण वाचविण्यासाठी आम्ही भाजपशी युती करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही जर चुकीचा निर्णय घेतला असता तर आजच्या फेरीत एवढी माणसे आली असती का?’’ असा प्रश्नही त्यांनी विचारला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.