Loksabha Election Voting : सर्वांचे वेगवेगळे अंदाज

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात यावेळीही चुरशीची तिरंगी लढत राहिली. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील मतदारांमध्ये सकाळी आणि सायंकाळच्या सत्रांमध्ये उत्साह दिसून आला.
Loksabha Election Voting
Loksabha Election Votingsakal

औरंगाबाद : लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात यावेळीही चुरशीची तिरंगी लढत राहिली. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील मतदारांमध्ये सकाळी आणि सायंकाळच्या सत्रांमध्ये उत्साह दिसून आला. महायुतीकडून शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत झाली. भुमरे यांच्यासाठी भाजपची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्षात मैदानात उतरल्याचे चित्र होते.

चंद्रकांत खैरे यांच्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मैदानात होते तर एमआयएमकडून मुस्लिम, दलितबहुल भागात जोर लावण्यात आल्याचे चित्र राहिले. अटीतटीची तुल्यबळ लढत असल्याने मतविभाजनातून कुणाची लॉटरी लागणार याचे अंदाज लावले जात आहे. यंदा सगळ्यांचीच मते विभागली गेली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना, निरीक्षकांना अंदाज बांधणे कठीण जात आहे. सध्या तिन्ही उमेदवार आपल्या विजयाचा दावा करताना दिसताहेत.

  • शिवसेनेची सर्व भिस्त राहिली भाजपवर

  • मुस्लिम मते एमआयएमच्या पारड्यात

  • मराठा, ओबीसी, दलित मते विभागली

  • सहा पैकी पाच ठिकाणी महायुतीचे आमदार

  • शहरी भागापेक्षा ग्रामीणमध्ये मतदानात वाढ

जालना : लोकसभेच्या जालना मतदारसंघात यावेळची निवडणूक चुरशीची आहे. मागील पाच निवडणुकीत शिवसेनेसोबत असल्याने भाजपचा सहज विजयी झाला. मात्र, यंदा शिवसेनेत फूट पडली. मतदानाचे विभाजन झाले.

त्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मराठा समाज आणि शिवसेनेचा कल महत्त्वाचा असताना यावेळी विक्रमी ६९.१८ टक्के मतदान झाले. त्यामुळे  वाढलेल्या मतांसह छुप्या राजकीय खेळींचे उमेदवारांना टेंशन असल्याचे चित्र आहे. जालना मतदारसंघात एकूण २६ उमेदवार रिंगणात असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढ पाहण्यास मिळाली.

यात भाजपचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे पाच वेळा विजयी झाल्यानंतर सहाव्यांदा रिंगणात उतरले. ऐनवेळी महाविकास आघाडीकडून डॉ. कल्याण काळे यांनी उमेदवारी मिळाली. मात्र, प्रचारादरम्यान काळे यांनी दानवे यांना कडवी फाइट दिल्याचे चित्र आहे. परिणामी, ही निवडणूक अटीतटीची झाली. या निवडणुकीवर मराठा आरक्षण आंदोलनाचाही परिणाम होणार आहे.

  • मोदींच्या गॅरंटीवर भाजपचा विश्‍वास

  • काँग्रेसकडून महागाईचा मुद्द्यांवर जोर, संविधान बचाव, रोजगार देण्याचे आश्‍वासन

  • वंचितचा फारसा परिणाम नाही

  • मराठा मतदारांची भूमिका महत्त्वाची

बीड : या निवडणुकीत महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सर्व लोकसभा मतदारसंघांपेक्षा आणि बीड जिल्ह्याच्या इतिहासातही आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान (७०.९२ टक्के) जिल्ह्यात झाले. पण, वाढत्या मतांच्या टक्केवारीने दोन्ही प्रमुख पक्षांना चक्रावून सोडले आहे.

निवडणुकीचा निकाल हा परळी व आष्टी विधानसभा मतदारसंघांवर केंद्रित झाला आहे. बीड मतदारसंघात ४१ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजपच्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात झाली. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त ताकदीमुळे मतदानाच्या बूथ यंत्रणेत भाजप सरस ठरल्याचे दिसले.

परळीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) ची यंत्रणा मतदानादिवशी सपशेल कोलमडल्याचे चित्र होते. त्यामुळे आता निकालातही परळी केंद्रस्थानी असेल.

  • भाजपला मोदींच्या गॅरंटीचा विश्वास अन् मुस्लिम मतांचीही भीती

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून संविधान बचाओ, महागाई, रोजगार, रेल्वे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भर

  • ‘वंचित’चा प्रभाव मागच्या तुलनेत ओसरला

  • भाजपची भिस्त ओबीसी मतांवर

  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भिस्त मराठा, मुस्लिम, दलित मतांवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com