Nana Patole : सांगलीत काँग्रेस आघाडी धर्म पाळेल ; नाना पटोलेंचे प्रतिपादन,चंद्रहार पाटील यांनी केले काँग्रेस नेत्यांचे स्वागत

‘सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली. पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या, परिस्थिती जाणून घेतली. आम्हाला दुःख आहेच, मात्र देशाची परिस्थिती भयावह आहे. भाजपला पराभूत करायचे आहे.
Nana Patole
Nana Patolesakal

सांगली : ‘‘सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली. पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या, परिस्थिती जाणून घेतली. आम्हाला दुःख आहेच, मात्र देशाची परिस्थिती भयावह आहे. भाजपला पराभूत करायचे आहे. त्यासाठी सांगलीतील काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडी धर्माचे पालन करतील. शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात उतरतील,’’ अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, आमदार विश्‍वजित कदम, आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी काँग्रेस नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

बंडखोरी केल्याबद्दल विशाल पाटील यांच्यावर कारवाई करणार का, या प्रश्‍नावर नाना पटोले म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील परिस्थितीचा एक अहवाल मी दिल्लीला पाठवणार आहे. तेथील शिस्तपालन समिती त्यावर निर्णय घेईल. त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल.’’

पटोले म्हणाले, ‘‘भाजपने सत्तेचा दुरूपयोग केला. देश विकला, कर्जबाजारी केला. हे पाप भाजपचे आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे आहे. आमच्या नेत्या सोनिया, राहुल गांधी यांना त्रास दिला. तो त्रास आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता विसरणार नाही. पुन्हा या देशात भाजप सरकार येता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आमचे कार्यकर्ते सगळे बाजूला ठेवून काम करतील.’’

Nana Patole
Loksabha Election 2024 : शेतकरीकल्याणाला प्राधान्य ; कर्जमुक्तीचे उद्धव ठाकरेंचे वचन

काँग्रेस हतबल नाही

सांगलीची जागा ज्या पद्धतीने शिवसेनेने रेटली, ती पाहता काँग्रेस हतबल होती का, या प्रश्‍नावर नाना पटोले म्हणाले, ‘‘काँग्रेस हतबल नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. देशाचे स्वातंत्र्य आणि देशाच्या संविधाननिर्मितीत काँग्रेसचे योगदान आहे. ते वाचवणे कॉँग्रेसचीच जबाबदारी आहे. आम्हाला लोभापेक्षा देश महत्त्वाचा आहे. त्यामुळे काहीवेळा एक पाऊल मागे यावे लागते. देश तुटू नये, ही भूमिका पहिल्यांदा महत्वाची आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com