Prithviraj Chavan: २०१९ ला नाईलाजास्तव आघाडी केली पण.. पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं सांगलीची सीट सोडण्यामागचे कारण

Sangali Loksabha Election: सांगलीचा उमेदवार ठरवताना एक मिनिटही लागणार नाही असे वाटायचे. परंतू यामध्ये बरेच राजकारण झाले.
Prithviraj Chavan on sangli loksabha election seat
Prithviraj Chavan on sangli loksabha election seatEsakal

लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीत काँग्रेसमधून बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा सुरू आहे.

यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, युती-आघाडी करुन निवडणूक लढवताना मित्र पक्षांमध्ये संघर्ष होत असतात. पण सांगलीच्या जागेवरुन झालेला संघर्ष हा पण सांगलीच्या जागेवरून झालेला संघर्ष हा न भूतो ना भविष्यती असा होता, असे सांगत कार्यकर्त्यांसमोर अनेक गोष्टी उघडल्या.

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले 2019 मध्ये आपल्याला नाईलाजस्तव तीन पक्षांची आघाडी करावी लागली. जर 2019 ला वेगळा निकाल लागला असता तर कशाला आघाडी केली असती. पण नाईलाजस्तव केलेल्या आघाडीची किंमत सांगलीच्या रुपाने मोजावी लागत आहे. पण काहीही असले तरी या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा आणि देशात इंडिया आघाडीचा विजय झाला पाहिजे अन्यथा पुढील पिड्यांचा शाप आपल्याला घ्यावा लागेल. त्यामुळे आपल्याला एकत्र काम करत महाविकास आघाडीला विजयी करावे लागेल.

Prithviraj Chavan on sangli loksabha election seat
Sangali Loksabha: सांगलीत विशाल पाटील एकाकी? मित्रपक्षांना इशारा देत विश्वजीत कदमांचा आघाडीचे काम करण्याचा निर्णय

यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, सांगली हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस बालेकिल्ला आहे. त्यामुळे सांगलीचा उमेदवार ठरवताना एक मिनिटही लागणार नाही असे वाटायचे. परंतू यामध्ये बरेच राजकारण झाले. मागच्या वेळीही असेच काहीतरी राजकारण झाले आणि काँग्रेसच्या हातातून ही सीट गेली. पण यंदा असे काही होणार नाही याची खात्री होती. पण सध्या आपण तीन पक्षांच्या आघाडीमध्ये असल्याने काही प्रश्न निर्माण झाले आणि पुन्हा ही जागा आपल्या हातून निसटली.

Prithviraj Chavan on sangli loksabha election seat
Sangli Lok Sabha : 'मशाल' पेलायला 'हात' मिळणार का? विशाल पाटलांच्या बंडखोरीने शिवसेना चिंतेत

2019 मध्ये एका विशिष्ठ परिस्थितीत भाजपच्या हाती पुन्हा 5 वर्षे सत्ता जाऊ नये ही निवडणून आलेल्या आमदारांची भावना होती. त्यामुळे आपल्याला तीन पक्षांची महाविकास आघाडी करावी लागणी आणि सरकार स्थापन झाले. आपला तिसरा नंबर होता, त्यामुळे संख्येप्रमाणे वाटा मिळाला. ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार चांगले चालले. पण पुढे काही राजकारण झाले. शिवसेना फोडण्यात आली. आणि याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजाश्रय होता, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com