Lok Sabha Election 2024 : मोदींकडे तिघांचा रिमोट ; राहुल गांधी यांची जगन, पवन, बाबू यांच्यावर टीका

Election Poll : ‘राजशेखर रेड्डी यांनी संपूर्ण राज्यात काढलेली पदयात्रा माझ्या ‘भारत जोडो’ यात्रेमागील प्रेरणा होती : राहुल गांधी
काँग्रेसच्या उमेदवार वाय.एस. शर्मिला यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी हे शनिवारी आंध्र प्रदेशात आले होते
काँग्रेसच्या उमेदवार वाय.एस. शर्मिला यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी हे शनिवारी आंध्र प्रदेशात आले होतेesakal

Andhra Pradesh News : ‘‘भाजपचा अर्थ ‘बाबू (टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू), जगन आणि पवन (जनसेनाचे संस्थापक पवन कल्याण) असा आहे. या तिन्ही नेत्यांचा रिमोट कंट्रोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कडप्पा येथील प्रचारसभेत केली.

काँग्रेसच्या उमेदवार वाय.एस. शर्मिला यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी हे शनिवारी आंध्र प्रदेशात आले होते
Andhra Pradesh Politics: बिहार झालं आता BJP चं लक्ष आंध्र प्रदेश...! भाजपचा फॉर्म्युला B-J-P काय आहे?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी आणि भाजपसह अन्य विरोधी पक्षांना राहुल गांधी यांनी भाषणात लक्ष्य केले. अांध्र प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांची आठवण काढताना ते म्हणाले, ‘‘राजशेखर रेड्डी यांनी संपूर्ण राज्यात काढलेली पदयात्रा माझ्या ‘भारत जोडो’ यात्रेमागील प्रेरणा होती. ते माझे वडील राजीव गांधी यांना भावासमान होते. दोन्ही नेत्यांचे वैयक्तिक संबंधही होते.’’

‘‘आंध्र प्रदेशाचा कारभार भाजपची ‘बी टीम’ चालवित आहे. ‘बी’चा अर्थ बाबू, ‘जे’ म्हणजे जगन आणि ‘पी’चा अर्थ पवन अशी भाजपची ‘बी टीम’ आहे. या तिघांचा रिमोट कंट्रोल मोदींकडे आहे.’’ हे नेते मोदींच्या नियंत्रणाखाली आहेत कारण त्यांच्याकडे ‘ईडी’, ‘सीबीआय’ आणि इतर तपास संस्था आहेत,’’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणांत शर्मिला यांना शुभेच्छा देत आंध्रात चांगले यश मिळेल, असा दावा केला. ‘वायएसआर’ यांच्या मूल्यांना त्या लोकसभेत न्याय देऊ शकतील, असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या उमेदवार वाय.एस. शर्मिला यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी हे शनिवारी आंध्र प्रदेशात आले होते
Lok Sabha Elections 2024 : केजरीवालांच्या भविष्यवाणीवर अमित शाहांचं उत्तर; म्हणाले, संविधानात कुठे लिहिलंय की मोदी...

‘‘यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात ‘इंडिया’ आघाडी सत्तेवर आल्यानंतर आंध्र प्रदेशला दहा वर्षे विशेष श्रेणीचा दर्जा दिला जाईल. तसेच पोलावरम प्रकल्प, कडप्पा पोलाद प्रकल्प आणि इतर आश्वासने पूर्ण करण्यात येतील,’’ असे त्यांनी सांगितले. माझी ‘बहीण’ आणि आंध्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षा वाय.एस. शर्मिला यांना लोकसभेत पाठवण्याचे आवाहन गांधी यांनी कडप्पा आणि आंध्र प्रदेशातील नागरिकांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com