Heat Wave : वाढत्या उष्म्याने नेत्यांना धडकी; मतदान वाढीचे आव्हान, मतदारांना केंद्रापर्यंत आणायचे कसे?

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात निर्माण झालेली उष्णतेची लाट (Heat Wave) शमली होती.
Heat Wave
Heat Waveesakal
Summary

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सातपासून मतदानास सुरुवात झाली आहे.

वैभववाडी : सिंधुदुर्गात (Sindhudurg) गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा उष्म्याची लाटसदृश्‍‍य स्थिती निर्माण झाल्याने राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि कार्यकर्त्यांना धडकी भरली आहे. आज होणाऱ्या प्रक्रियेत मतदारांना केंद्रापर्यंत आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. दोन्ही प्रमुख पक्षांकडून जास्तीत जास्त मतदानासाठी छुपी रणनीती आखली जात असली तरी लोकांना त्यांच्या कलाने घेत मतदान केंद्रापर्यंत आणणे मुश्‍‍कील बनण्याची भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Heat Wave
Chikkodi Lok Sabha : चिक्कोडी मतदारसंघातून 1 लाखाहून अधिक मतांच्या फरकाने विजयी होणार; पालकमंत्र्यांच्या मुलीला विश्वास

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात निर्माण झालेली उष्णतेची लाट (Heat Wave) शमली होती. त्यानंतर वातावरणात बदल झाला होता. हवेतही काही अंशी गारवा निर्माण झाल्याचे चित्र होते. परंतु, ४ मेपासून पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली असून ढगाळ आणि दमट वातावरणामुळे उष्णतेची लाटसदृश्‍‍य स्थिती निर्माण झाली आहे. सकाळी दहा अकरा वाजल्यानंतर उष्म्याने अंगाची लाही लाही होत आहे.

Heat Wave
Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. या वाढलेल्या उष्म्याचा धसका राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघासाठी उद्या (ता. ७) निवडणूक होत आहे. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि खासदार विनायक राऊत यांच्यात काँटे की टक्कर होत आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुरशीचे वातावरण आहे.

या निवडणुकीच्या प्रचाराने जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले होते. परंतु, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाटसदृश्‍‍य स्थिती आहे. सर्वजण वाढलेल्या उष्म्याने हैराण झाले आहेत. या उष्म्याचा मोठा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची भीती राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदान हे सकाळी दहा, अकरापूर्वी व्हावे यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न होण्याचा अंदाज आहे. मतदान केंद्रावरही सकाळच्या सत्रात आणि सायंकाळी चार वाजल्यानंतर मतदानासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Heat Wave
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : 192 ज्येष्ठांनी गमावला मतदानाचा हक्क, काय आहे कारण?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सकाळी सातपासून मतदानास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्मा जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने उन्हापासून बचावासाठी मतदान केंद्रावर प्रतीक्षालय उभारले असून पाण्याची व्यवस्था केली आहे. शिवाय आरोग्य सुविधाही उपलब्ध केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा.

-किशोर तावडे, जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com