Satara Lok Sabha : सातारा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही; शिवेंद्रसिंहराजेंनी कोणाला दिलं आव्हान?

पूर्वी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटले जायचे. आता तो बालेकिल्ला राहिलेला नाही.
Udayanraje Bhosale ShivendraRaje Bhosale
Udayanraje Bhosale ShivendraRaje Bhosaleesakal
Summary

'अद्याप महायुतीच्या जागा वाटपात साताऱ्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही; पण जो कोणी आमचा उमेदवार असेल तो उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येईल.'

सातारा : सध्या जिल्ह्यात भाजपची (BJP) ताकद वाढली असून, त्यातूनच आम्हाला भाजपच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे. पूर्वी सातारा (Satara Lok Sabha) जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटले जायचे. आता तो बालेकिल्ला राहिलेला नाही, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी व्यक्त केले.

Udayanraje Bhosale ShivendraRaje Bhosale
'आताचे शाहू महाराज दत्तक आहेत, ते खरे वारसदार नाहीत'; मंडलिकांच्या वादग्रस्त वक्तव्याचे कोल्हापुरात तीव्र पडसाद

आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या शक्तिप्रदर्शनावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी टिप्पणी केली आहे. आमदार शशिकांत शिंदेंच्या आजच्या शक्तिप्रदर्शनाचे तुम्हाला आव्हान वाटते का, या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘‘आव्हान देण्यासाठीच निवडणुका असतात; पण भारतीय जनता पक्षाची ताकद जिल्ह्यात वाढली आहे. त्यातूनच आम्हाला भाजपच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे.

सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वाढलेली ताकद लक्षात घेता आमची मागणी होती, की महायुतीत सातारा लोकसभेची जागा ही भाजपकडे राहावी, अशी आमची मागणी आहे. पूर्वी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटले जायचे. आता तो बालेकिल्ला राहिलेला नाही, हे चित्र स्पष्ट दिसत आहे. भाजपचे गावपातळीवर काम करणारे छोटे कार्यकर्ते असतील. त्यांना ते पदाधिकारी झाले नसतील तसेच राजकारणात मोठे झालेले नसतील; पण त्यांची सगळ्यांची मागणी होती, की साताऱ्याची ही जागा भाजपनेच लढली पाहिजे.

Udayanraje Bhosale ShivendraRaje Bhosale
Kolhapur Lok Sabha : 'राज्यात महायुतीचे 45, तर देशात NDA चे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील' - शंभूराज देसाई

अद्याप महायुतीच्या जागा वाटपात साताऱ्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही; पण जो कोणी आमचा उमेदवार असेल तो उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येईल. राहिला विषय आव्हानाचा, आव्हान देण्यासाठीच निवडणुका असतात. पक्षाची ताकद वाढली आहे, त्यातूनच आम्हाला भाजपच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com