Sharad Pawar : बाहेर गेलेल्यांना जागा दाखवा ; शरद पवार यांचे आवाहन,सुपे येथील दौऱ्यात केंद्रावर टीका

‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघर्ष भाजप आणि आमच्यातून बाहेर गेलेल्यांशी आहे. पक्ष कोणी स्थापन केला? काही लोकांनी वेगळी भूमिका मांडली, जी समाजाच्या हिताची नाही. याचा निकाल या निवडणुकीत तुम्ही घेणार आहात,’’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलेे.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

सुपे : ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघर्ष भाजप आणि आमच्यातून बाहेर गेलेल्यांशी आहे. पक्ष कोणी स्थापन केला? काही लोकांनी वेगळी भूमिका मांडली, जी समाजाच्या हिताची नाही. याचा निकाल या निवडणुकीत तुम्ही घेणार आहात,’’ असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलेे.

सुपे (ता. बारामती) येथे सुसंवाद दौऱ्यानिमित्त त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते पवार म्हणाले, ‘‘तुम्ही ज्यांना आधी निवडून दिले, त्यांनी संसदेत तुमचे प्रश्न मांडले. त्यात सुप्रिया सुळेंचे नाव पहिले आहे. मी सत्तेत होतो त्यावेळी सत्ता तुमच्यासाठी वापरली. एकेकाळी पुण्यात, पिंपरी-चिंचवडला कारखाने असायचे. त्यावेळी सुमारे एक लाख बेरोजगारांच्या हाताला काम दिले. त्यानंतर जेजुरी, बारामती, सासवड, इंदापूर, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात अनेक कंपन्यांमध्ये हजारो कामगारांच्या हाताला कामे मिळाली. हे काम आताच्या सरकारने केले नाही.’’

आमदार संजय जगताप म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारी सुपे परगण्यासारखीच पुरंदरची स्थिती आहे. बारामतीप्रमाणेच पुरंदरसुद्धा कुठेही कमी पडणार नाही. ५० हजारांचे मताधिक्य देणार असल्याचे बघायला मिळेल. भाजप सरकारला जागा दाखवण्याची वेळ आली आहे.’’

या वेळी पुरंदरचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, सदाशिव सातव, विजय कोलते, संभाजीराव झेंडे, अॅड. एस. एन. जगताप, सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे, युगेंद्र पवार आदी उपस्थित होते. हनुमंत चांदगुडे यांनी प्रास्ताविक; तर दीपक वाबळे, समाधान देशमुख, हृषिकेश गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिन लडकत यांनी आभार मानले.

Sharad Pawar
Mumbai Loksabha News: दक्षिण मध्य मुंबईत सेनेच्या प्रचारातून काँग्रेस गायब; आघाडीला बसणार फटका?

‘त्यांनी काय दिवे लावले?’

कोणाचे नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार पुढे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला? जनाई उपसा योजना कोणी सुरू केली? शैक्षणिक संकुल कोणी उभारले, हे आपणास माहिती आहे. नव्या पिढीच्या हातात देण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्या हातात दिले, त्यांनी काय दिवे लावले? पाण्याचे दुखणे तसेच आहे. दुरुस्ती करण्याची हिंमत माझ्यात आहे. माझे वय झाले नाही.’’

शरद पवार म्हणाले

झारखंड व दिल्लीचे मुख्यमंत्री मोदींच्या मनाविरुद्ध बोलले, त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध टीका केल्याने ते आज तुरुंगात...ही हुकूमशाहीच केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, कांदा, सोयाबीनच्या उत्पादनाचाही खर्च निघत नाही काही गावांमध्ये प्यायला पाणी नाही, चाऱ्याची कमतरता असल्याचे सरकारला पुन्हा सांगावे लागते आता निर्णय घेण्याची संधी जनतेकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com