नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार आपल्या संपर्कात आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मोदींनी हा खोटा दावा करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असून, त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवार (काल) पार पडले. हे मतदान सुरू असतानाच पंतप्रधान मोदींनी तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, की ''ममतादीदी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुमचे मतदारही तुम्हाला सोडून जातील. सध्या तुमच्या पक्षाचे 40 आमदार माझ्या संपर्कात आहेत''.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या विधानावरुन तृणमूल काँग्रेस आक्रमक झाली असून, याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.