Congress Manifesto : काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील 5 प्रमुख मुद्दे

Congress Manifesto : काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील 5 प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज (मंगळवार) जाहीरनामा प्रसिद्ध केले. या जाहीरनाम्यात बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भर देण्यात आला आहे. तसेच न्याय योजनेतून देण्यात येणाऱ्या 72 हजार रुपयांची हमी आम्ही देत आहोत. या जाहीरनाम्यात नागरिकांच्या मन की बात असल्याचे म्हटले आहे. 

हे आहेत पाच प्रमुख मुद्दे :

1) न्याय : ही योजना देशासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. गरिबीवर वार 72 हजार ही योजना आम्ही आणली आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारणार आहे. गरिबांचे किमान उत्पन्न वर्षाला 72 हजार असणार आहे.

2) रोजगार : 22 लाख सरकारी नोकऱ्या रिक्त आहेत. त्या आम्ही 2020 पर्यंत भरती करणार आहेत. 10 लाख ग्रामपंचायतींमध्ये जागा रिक्त आहेत. व्यवसायासाठी तीन वर्षांपर्यंत कोणतीही परवानगी घ्यायची गरज नाही. युवकांना याचा खूप फायदा होणार आहे. बँकांचा दरवाजे युवकांसाठी खुले असतील. मनरेगामध्ये 100 हून 150 दिवसांचे किमान वेतन मिळणार आहे.

3) शिक्षण : आयआयटी, आयएमएम अशा शैक्षणिक संस्था सर्वांसाठी खुल्या असतील. जीडीपीतील 6 टक्के पैसा शिक्षणासाठी वापरण्यात येईल.
 

4) शेती: काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादरकरणार. तसेच, शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही, तरी फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही. शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प आम्ही मांडू. शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारे पैसे किती असतील हे यातून स्पष्ट होते.

5) कायदा : काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यास भारतीय दंड संहितेमधील कलम 124 अ वगळू, असं आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आलं आहे. कलम 124 अ देशद्रोहाशी संबंधित आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com